14 जुलै 2019, नेहमीप्रमाणे एकमेकांवर कुरघोडी करण्यात जगातील राष्ट्रे गर्क होती पण इंग्लंड दोन ऐतिहासिक अदभुत अविश्वसनीय आणि अतर्क्य आशा फायनलचे साक्षीदार होणार होते. टेनिस आणि क्रिकेट समर्थक सोडले तर बाकीच्यासाठी हा नॉर्मल दिवस पण ह्या दोन खेळासाठी हा 'गोल्डन डे' होता. एकीकडे पहिल्या विश्वकप साठी लॉर्ड्सवर ब्रिटन न्युझिलंड झुंजणार होती तर वर्ल्ड नंबर वन जोको विरुध्द 38 वर्षाचा तरुण!! फेडरर आपल्या विक्रमी एकविसाव्या ग्रँडस्लॅम साठी खेळणार होता।।। काल पर्यंत अफ्रिका ऑस्ट्रेलिया चा 99च्या सेमिफायनलचा थरार असो अथवा 06 चा वांडरर्स वरील वंडर असो या दोन सामन्यांना इतिहासातील सर्वोत्कृष्ट सामने म्हणून क्रिकेट फॅन्स कधीच नाकारु शकत नव्हते. पण हो फक्त काल पर्यंतच!! शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या चेंडुपर्यंत श्वास रोखणाऱ्या या खेळाने काल परमोच्य आनंद मिळवून दिला. क्रिकेट मध्ये टाय होणारे सामने बोटावर मोजण्याइतके त्यात वर्ल्डकप मध्ये इनमिन चारच. वर्ल्डकपची सर्वात क्लोज फायनल 92 ची पाक इंग्लंड ज्यात यजमानांना सात धावाने पराभव पत्करावा लागला. म्हणजे फायनल टाय होण्याचा विचार क्रिकेटन
"समाधी सोहळा श्री दामाजी अप्पा" महाराष्ट्रात सांस्कृतिक दृष्ट्या भागवत धर्माचे कार्य फार मोठे आहे. या भागवत धर्माचा पाया संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी घातला 'ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालेसे कळस।।' संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य जनतेच्या अंतकरणावर वारकरी पंथाचा पगडा बसवला व वैदिक धर्माचे तत्वज्ञान आपल्या अमृत मधुर वाणीने सांगुन सामान्य माणसाच्या निसत्व जीवनाला अध्यात्माची जोड मिळवून दिली. विठ्ठलावर श्रध्दा असलेला हा वारकरी संप्रदाय आषाढी कार्तिकेला नित्यनेमाने पंढरपूरला जातो. 'पंढरिचा वारकरी वारी न चुकू दे हारी।'. आणि ह्याच भक्तीला पुढे करत संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरोबा काका, संत जनाबाई या संतानी तेराव्या शतकात समाज प्रबोधनाचे कार्य केले. हीच संत परंपरा सतराव्या शतकात संत तुकाराम, संत एकनाथांनी कळसापर्यंत नेली. याच काळात परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात 'गोदावरी' नदीच्या काठावर असलेल्या 'आरखेड' या लहानश्या टुमदार गावात 'संत दामाजी अप्पा उदयास आले. आरखेड हे गोदावरी व गळाटी नदीच्या निसर्गरम्य संगमावर वसले आहे. पश्चिमेस